सूर्य फिरला
सावली फिरली
डोक्यावरची
छाया गेली
बदलला ऋतू
उडाले पक्षी
सोबत राहतील
वाटलं होतं
भूकंप येताच
पडली घरं
खंबिर उभी
केली होती
उतार होता
वाहिली नदी
समुद्राकडं
गरज नव्हती
आल्या समस्या
बदलली माणसं
साथ देतील
वाटलं होतं
Copyright © 2010 रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षीत!
साथ
कवी * Rohan Jagtap 0 comments
Labels: kavita, marathi kavita, Rohan Jagtap, कविता, मराठी कविता, रोहन जगताप, साथ
Subscribe to:
Posts (Atom)

